Tuesday, 25 September 2012

फक्त कौतुक पुरेसे नाही....



मेटाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांचे जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस आणणारे पत्र....
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=251901:2012-09-24-20-21-42&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2
खरतर^ निडर, प्रामाणिक आणि कर्तव्यक्षम अधिकारार्‍य़ाचे कौतुक करावे तितके कमी आहे. पण फक्त कौतुक पुरेसे नाही.
पांढरेंनी या पत्रातून प्रकल्पातीला घोटाळे निदर्शनास आणून हात काळे झालेल्या कालिया नेत्यांच्या(नावे देण्याची गरज नाही) शेपटीवरच पाय ठेवला आहे. तेव्हा हा कालिया डंख मारल्याशिवाय राहणार नाही. अशा परिस्थितीत राज्यसरकारने सरकारी सेवेतील या अधिकार्‍यास संरक्षण दिले पाहिजे. पांढरे यांना आपणही सर्वांनी पाठिंबा देण्याची गरज आहे. हा पाठिंबा फक्त फेसबुक, टिव्टीर या सारख्या सोशल नेटवर्किंग साईटवरुन पुरेसा नाही. राज्यसरकारला या पत्राची दखल घेण्यास भाग पाडण्यासाठी काही ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. चव्हाणांनी आता जलसंपदा विभागाची श्वेतपत्रिका काढलीच पाहिजे, ही मागणी लावून धरली पाहिजे. तेव्हाच कळेल खरे पाणी कुठे आणि किती मुरते आहे.

1 comment:

  1. अगदी योग्य शब्दात मांडले आहेस.

    ReplyDelete